काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडून
रटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.
उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;
अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच उभे करणाऱ्या; मनात, तनात आसमतात झटक्यात बदल करण्याची निर्मिती क्षमता जी वाहते ती कविता.
सरळ, साध्या, ओघवत्या भाषेतून वाचकाला स्वतःचीच कृती असल्याचा भास निर्मिती करते ती कविता.
मनभर तुडुंब भरलेल्या आणि हवेच्या झुळूकेने प्रवाही होणाऱ्या शब्दरूप भावना म्हणजे कविता. भाव – भावनाचा जबरदस्त उमाळा; सुयोग्य अन् उत्कृष्ट शब्दांद्वारे गेयता पकडून प्रसवणं म्हणजे कविता.
मीच मला भावते, मीच मला वाचते, मीच मला गाते, मीच मला आकळते, मीच मला अनुभवते. मी म्हणजे ती, ती म्हणजे मी
काय म्हणावे या स्थितीला?
काव्य जगणे म्हणावे या स्थितीला.
ranjanarao.com
Ranjana Rao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More